Saturday, May 23, 2015

========= केतकी ==========






सकाळी रस्त्यात माझा एक हिजडा मित्र भेटला. त्याच्याशी बोलताना समजल केतकी वारली. मला वाईट वाटल. पण माझ्या मित्राला ते नाही आवडल. म्हणाला "नाराज क्यो हो रहा है ? छुट गयी इस भयानक लाई्फसे. आनंद होना चाहिये" कस तरी वाटल एेकुन ते.



मी केतकीवर पुर्वी लिहिलेला माझा अनुभव शेअर करतोय.



काही वर्षांपूर्वी मी मुंबईला स्कुटरनी जात होतो. स्कुटर सिग्नलपाशी थांबवली व मी सिग्नल मिळायची वाट बघत होतो. बाजुला गटाराच्या जवळ दोन हिजडे भिक मागुन मिळालेल खात होते. मला हिजड्यांचा प्रचंड राग होता व किळस वाटायची. मी त्या दोघांकडे तुच्छतेनी पाहिल आणि पचकन थुकलो. हिजडे एकमेकांशी बोलताना अत्यंत घाण शिव्या देत, गलिच्छ अंगविक्षेप करत बोलतात. शाप देतात. हेच मला माहिती होत. मी पाहिलेले हिजडे असेच होते.



या हिजड्यांच बोलण मला ऎकायला येत होत. ते हिंदी बोलताना मधेच उत्तम इंग्रजी बोलत होते. निदान माझ्यापेक्षा तरी त्यांच इंग्रजी चांगलच होत. माझ कुतुहल जाग झालं. मी स्कुटर बाजुला घेतली व थांबलो. त्यांच बोलण लक्ष देऊन एेकायला लागलो. ते दोघ मृत्युबद्दल बोलत होते.



त्यातल्या एकानी The Death या कवितेतल एक कडव म्हणल.



"Those that I fight, I do not hate...
Those that I guard I do not love..
A lonely impulse of delight
Drove to this tumult in the clouds"



थोड्यावेळापुर्वी मी याच हिजड्याकडे बघुन थुकलो होतो. माझीच मला लाज वाटली.



मी त्याची चौकशी केली. आयुष्यात प्रथमच मी एका हिजड्याशी स्वतःहुन बोलत होतो. रस्त्यातले लोकं माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत होतो. पण आता मला त्याची पर्वा नव्हती.



मी त्याला नांव विचारल त्यानी "केतकी" अस सांगितल. मी दचकलोच. चेहर्‍यावर दाढीचे खुंट असलेली केतकी ? माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन त्यानी सांगितल.



"माझ मन आहे ते देवानी स्त्रीचच केलेल आहे, आणि शरिर पुरुषाच. पण मला ते मान्य नाही. मनानी मी स्त्री आहे. पुरुषी शरिरात असलेली एक संपूर्ण स्त्री"



हे त्यानी अत्यंत सभ्य भाषेत सांगितल. कुठेही घाण हावभाव नाही की घाण शब्द नाही. मी या माझ्या मैत्रिणीला एक स्त्री मानल. तीच्या सेक्स चॉईसला मान द्यावासा वाटला मला.



केतकी मद्रास युनिव्हर्सिटितुन इंग्रजीत MA झालेली होती. तीचं इंग्रजी आमच्या कॉलेजच्या प्रोफ़ेसर इतक चांगल व शाळेच्या इंग्रजीच्या बाईंपेक्षा कितीतरी चांगल होत. पण तीला कोणीच नोकरी द्यायला तयार नव्हत. समाजाचही बरोबर होतं.त्यांच्यावर असलेली संस्कारांची पुटं लगेच थोडीच जाणार होती ? एका हिजड्याला कधी नोकरी देतात का ? त्याला आपल्यासारख जगण्याचा काय अधिकार ?



माझ्याशी बोलताना ती सहजपणे म्हणाली "In school I was taught that we are masters of our own destiny. But life taught me that we are bound by it. And now what you see is my destiny. I must accept it."



हे ऎकल्यावर माझ्या पोटात कस तरी झाल.



पवई भागात ही मला नेहेमी दिसायची. जाता येता मी मुद्दम थांबुन तीच्याशी बोलायचो. तीला तेव्हढ्यानीसुद्धा बरं वाटायच. किती छोटी आपेक्षा. ती भिक मागत असायची. पण मी भिक दिली तर ती नाही घ्यायची. म्हणायची की "तू माझा मित्र आहेस. फ़क्त मित्रासारखाच रहा"



तीला भिक मागायची नसायची. काही व्यवसाय करायचा होता. तीला सकाळी पेपर घरोघर टाकण्याचा व्यवसाय दिला. पण लोकांना एक हिजडा सकाळी सकाळी दारात आलेला आवडत नव्हता.
तीनी स्टेशनरीच्या वस्तु गाडीत विकायचा व्यवसाय केला. पण तीच्याकडून लोक या वस्तु विकत घ्यायला तयार नसायचे व इतर हिजड्यांनी तीला हे विकताना पाहिल तर ते तीला खुप शिव्या द्यायचे.
कारण हिजड्यांच्या समाजानी हिजड्यांना जगण्यासाठी दोनच पर्याय समोर ठेवलेत एकतर स्वतःच शरिर घाण करायच आणि ऎडस्‌ पसरवायचा वा टाळ्या वाजवुन, शिव्या शाप देऊन भिक मिळवायची. तिसरा पर्याय नाही.



ती नंतर परत मद्रासला गेली. पुढे संपर्कच नाही,



हिजड्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्यामुळे यांच पुनर्वसन खुप कठिण जातं. एक असा गैरसमज आहे की हिजड्याच तोंड पाहिल की दिवस खराब जातो, त्यांना जादू टोणा चांगल्यापैकी माहिती असतो, त्यामुळे समाजानी यांना खुप दूर ठेवलेल आहे. त्याच्या वस्त्या ह्या वेश्या वस्त्यांच्या जवळ असतात.



काही वर्षांपूर्वीच हिजड्यांना कायद्याई मान्यता देऊन त्यांची मतदार म्हणून नोंदवणी केलेली आहे. त्यांना रेशन कार्ड मिळालेली आहेत. पण तरी हे काम खुप कमी पडत.



मी काही हिजडे हे खुप शिकलेले पाहिलेले आहेत. त्यांना शरिर विक्रयाचा व्यवसाय करायचा नसतो. भिकमागुन जगणं नको असत. त्यांना आपल्यासारख काही चांगल काम करायच असत. मेहनतीनी पैसे मिळवुन खायच असतं. आपेक्षा फ़ारच थोडी असते. पण ही माफ़क आपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग यांचा संबंध येतो तो वेश्या व गुन्हेगार यांच्याशी.



खर तर आपल्या स्वार्थाचा विचार केला तरी, आपल्या समाजाला सुरक्षित जिवन मिळाव यासाठी तरी यांच पुनर्वसन करण आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment