Saturday, May 23, 2015

ऑनलाईन ऎज्युकेशन





मनोहर खेड्यातला चुणचुणीत मुलगा. त्याला खुप शिकवाव अस आई-वडलांच्या मनात होत. गावात 10 वी पर्यंत शाळा होती. एकच शिक्षक सर्वांना शिकवत होते. शिक्षकांना शिकवण्याची फ़ारशी आवड नव्हतीच. कोणतीच नोकरी मिळत नाही म्हणुन मग त्यांनी ही नोकरी धरली होती. त्यांना मुलांना मारायला जास्त आवडायच. कोणा मुलानी काही त्रास दिला, वाजवीपेक्षा जास्त प्रश्न विचारले की त्या मुलाच्या कानफ़टात बसलीच म्हणुन समजा. मनोहर शिक्षकांनी दिलेला अभ्यास, गणितं लगेच पूर्ण करायचा. त्याच्या मनात अनेक प्रश्न यायचे. वारा वाहतो म्हणजे काय होत ? पाऊस पडतो तो पावसाळ्यातच का पडतो ? पक्षी उंच उडतो तेव्हा पंख हालवत असतो. पण विमान उंच उडताना त्याचे पंख हालत नाहीत मग ते विमान खाली का पडत नाही ? एक ना अनेक असे विचार त्याच्या मनात येत. शिक्षकांना विचारल तर मार खावा लागत होता. घरी आई-वडिल सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकत नव्हते. खर तर मनोहरच्या आई-वडलांना स्वतः पुढे शिकाव अस वाटत होत. पण या खेड्यात राहुन ते शक्य नव्हतं.

सुकृत शहरातला मुलगा. तसा हुशारच. शाळेत दिलेला अभ्यास नेमानी करायचा. धडेच्या धडे तोंड पाठ असायचे. शाळेत जाताना स्वच्छ युनिफ़ॉर्म असावा, इस्त्री केलेला असावा, बुटाला पॉलिश असाव या कडे शाळेच लक्ष असायच. शाळेत शिक्षिका छान छान कपडे करुन येत. ५ वा आयोग, ६ वा आयोग त्यांचा पगार वाढत होता व त्या बरोबर त्यांचा नट्टापट्टा सुद्धा वाढत होता. मुलांच्या कडुन धडे पाठ करुन घेतले की त्यांच काम पूर्ण होत होतं. सुकृतला आलेले प्रश्न तो आई-बाबांना विचारायचा, अथवा वर्ल्ड बुक मधुन स्वतःच शोधायचा.सुकृतच्या आई-वडलांना पुढे शिकायच होत. पण कामाच्या व्यापात त्यांना कॉलेजला जाण्यासाठी सलग वेळ मिळण शक्यच नव्हतं.

काही दिवसांनी दोघेही एकाच शहरात शिकायला आले. १०वी ला दोघांनाही चांगले मार्क मिळाले पण दोघांनाही शिक्षणाचा आनंद कधीच मिळाला नाही. अभ्यास करण याचा अर्थ पुस्तकं पाठ करण असाच त्यांना समजला. दोघेही परिक्षा जवळ आली की आभ्यासाला लागतात. वर्षभरात फ़ार तर फ़ार १-२ महिने अभ्यास करावा लागे. बाकी वेळ काहीच नाही "टाईम पास" (आयुष्यातला सर्वात वाईट शब्द). दोघांच्याही आई-वडलांची स्वतःची शिकण्याची उमेद संपली होती.
हे का झाल ? कदाचित दोघेही आयुष्यात चमकतील. तो ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे. पण जेव्हा त्यांना नविन शिकायची आवड होती, जिज्ञासा होती त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल नाही. त्यांच्या आई-वडलांना स्वतःला शिकायच होतं पण त्यांना तशी संधीच मिळाली नाही.

-------------------------------------------------------------------
याचाच अर्थ आपली आजची शिक्षण पद्दत कुठे तरी चुकते अस वाटत. आणि म्हणुनच वाढती लोकसंख्या व शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेता शिक्षण पद्दती व परिक्षा पद्दतीत बदल होण अपरिहार्य आहे.
-------------------------------------------------------------------

शहरातल शिक्षण व खेड्यापाड्यातल शिक्षण याच्या दर्जामध्ये बराच फ़रक असतो. त्यामुळे शहरातला ७० % मिळवलेला विद्यार्थी, हा खेड्यातल्या ८० % मिळावलेल्या मुलापेक्षा करिअर मधे बराच पुढे जातो. हा अनुभव अनेकांना आहे.
शिक्षणाचा खर्च, शिक्षकांचा दर्जा या सर्वाचा विचार करता, ओनलाईन परिक्षापद्दत जास्त योग्य वाटते. या पद्दतीत एखादा विषयाचा जाणकार शिक्षक संगणकावर ऑनलाईन शिकवतो. हे सर्व संबंधीत विद्यार्थ्यांच्या संगणकावर प्रक्षेपित होतं व यातुन दर्जेदार शिक्षण मिळु शकत. यात दुश्राव्य माध्यमांचा पुरेपुर उपयोग केलेला असल्यामुळे शिक्षण सोप जात.
गेले काही वर्ष ऑनलाईन एज्युकेशन बर्यापैकी लोकप्रिय झाल आहे. त्याची काही कारण अशी आहेत की

१ काही विद्यार्थ्यांना शाळा/ कॉलेज/ युनिव्हर्सिटीच्या कॅंपसमधे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसते. याची अनेक कारण असतील

(अ) राहाण्याची जागा फ़ार दूर असेल, एखाच्या खेड्यात
(ब) कामाच्या व्यापात असा वेळ मिळाण शक्य नसेल

२. ऑनलाईन शिक्षणाच वेळा पत्रक ठराविकच असण्याची गरज नसते. त्यामुळे विद्यार्थी आपल्या मोकळ्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतो. तो त्याचा पूर्णवेळ व्यवसाय सांभाळुनसुद्धा शिकु शकतो.

३. एक चांगली ओनलाईन डिग्री हे चांगली नोकरी मिळण अथवा प्रमोशन मिळण यासाठी उपयोगी पडते.

४. शारिरीक व्यंग अथवा शाळा/कॉलेजच्या कँपसला जाण्याची असमर्थता असलेल्यांना ओनलाईन एज्युकेशन ही एक पर्वणीच आहे.

जरी ओनलाईन शिक्षणात अनेक फ़ायदे असले तरी काही तोटे आहेतच

१. ऑनलाईन शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी हे प्रत्यक्ष एकमेकांना भेट्लेले नसतात वा प्रत्यक्ष पाहु शकत नसतात व त्या्मुळे शिक्षक-विद्यार्थी हा संबंध कधीच तयार होत नाही. याचा परिणाम शिक्षणावर होतो व विद्यार्थ्याला विषय नक्की समजला आहे का व समजला असला तर तो नक्की किती समजला आहे हे शिक्षकाला कधीच समजत नाही. काही चांगल्या ओनलाईन सॉफ़्टवेअरमधे विद्यार्थी शिकत असताना मधेच त्याला विषयासंबंधी प्रश्न विचारुन त्याला विषय नक्की समजला आहे का हे चाचपल जात. तसच विद्यार्थ्यीमधेच शिक्षकाला प्रश्न विचारुन आपल्या शंकांच निरसन करु शकतो.

२. अनेक विद्यार्थ्यांबाबत, लेक्चर ऎकत असताना मधेच त्या वरच लक्ष उडण व त्यामुळे चालू लेक्चर मधला काही भाग लक्षात न येण. हा प्रकार दिसतो. चांगला शिक्षक विद्यार्थ्याच्या चेहर्‍याकडे पाहुन त्याचं विषयामधे लक्ष आहे अथवा नाही हे ओळखु शकतो व आपल्या बोलण्याचा वेग कमी अधीक करुन विद्यार्थ्यांच लक्ष परत आपल्या बोलण्याकडे लागेल हे पाहात असतो. ही गोष्ट ओनलाईन शिक्षणाच्या बाबतीत शक्य नाही. माझ्यामते तरी विद्यार्थी पुरेसा परिपक्व झाल्याशिवाय त्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षण ही पद्दत उपयोगी नाही याच हे एक मोठ कारण आहे.

३. विद्यार्थ्यांचा शिक्षक व बरोबरचे विद्यार्थी यांच्याशी संवाद होण फ़ार गरजेच असत. त्या साठी फ़ोरमचा उपयोग केला जाऊ शकतो.

------------------------------

ओनलाईन परिक्षा



आपली पुर्वीची पद्दत नक्कीच चांगली होती. त्यात प्रश्नांची सबजेक्टिव्ह उत्तर देण आपेक्षित होत. त्यामुळॆ मुलाला नक्की किती समजल आहे हे शिक्षकाला समजत होत. पूर्वी या प्रश्नांची उत्तर स्वतःच्या मनाची असावीत ही आपेक्षा होती. नंतर विद्यार्थांची संख्या वाढत गेली व पेपर तपासायचा शिक्षकांवरचा ताण वाढत गेला. आज २-३ मिनीटात संपूर्ण पेपर तपासुन शिक्षक हाता वेगळा करतो. यात विद्यार्थानी कस लिहिल आहे त्याला विषय़ समजला आहे का नाही याची चाचपणी करण अशक्य आहे. पेपर तपासनीसाला एक मॉडेल उत्तर पत्रिका दिली जाते व बहुतक परिक्षक त्याच प्रकारे उत्तराची आपेक्षा करतात. साहाजिकच पुस्तकातले परिच्छेद तसेच्या तसे पाठ करुन उतरवणं याकडे विद्यार्थांचा कल वाढत चालला. मी पाठांतराच्या विरोधात नक्किच नाही. जर विद्यार्थी विषय समजुन पाठ करत असेल तर ते नक्कीच चांगल आहे.

आता ८ वी पर्यंत मुलांना पास करणार म्हणल्यावर हाच लोड जास्त वाढणार. साहजिकच परिक्षापद्दतीत आमुलाग्र बदल आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्ह परिक्षा आपल्याला नव्या नाहीत. पण याची तपासणी संगणाका द्वारे करण याची आता गरज आहे. ही पद्दत नक्कीच पूर्ण योग्य नाही. पण ती जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो.

आपल्याकडे काही विषयांच्या ओनलाईन परिक्षा होतात. पण त्याच्या बाबत विद्यार्थी समाधानी वाटत नाहीत.

या परिक्षांमधे, संगणकात अनेक प्रश्न व त्याची उत्तर साठवून ठेवलेली असतात व हे प्रश्न विद्यार्थाला रॅंडमली विचारले जातात. त्यामुळे बाजु बाजुला बसलेल्या मुलांना वेगेवेगळे प्रश्न येतात. कॉपी करण्याचा प्रश्न येत नाही. व पेपर फ़ुटण्याचा सुद्धा प्रश्न नसतो.

या परिक्षेचा साधारण ठाचा असा असतो की एक प्रश्न व त्याची चार उत्तर दिलेली असतात व त्यातुन एक अथवा जास्त योग्य उत्तरं निवडायची असतात.

काही परिक्षांमधे विद्यार्थांना उत्तर पत्रिकेत ठराविक चौकोन पेन वा पेंसिलीनी पूर्ण भरायचा अस्तो. नंतर संगणक हा पेपर स्कॅन करुन त्याला तपासतो. ही पद्दत म्हणावी तेव्हढी बरोबर वाटात नाही कारण जर तो चौकोन भरताना काही चुक झाली तर त्या प्रश्नाचे मार्क कापले जातील.

काही परिक्षांमधे संगणाकावर ओनलाईन पेपर परिक्षेच्या आधी डाऊन्लोड केला जातो व हा त्या त्या विद्यार्थांसाठी ठरलेला पेपर त्याच्या नंबरानी स्टोअर केला जातो. यात प्रत्येक मुलाचा पेपर वेगळा असतो.

काही खुप चांगल्या तयार केलेल्या ओनलाईन परिक्षांना असलेले प्रश्न हे डायनॅमिकली बदलत असतात. उदाहरण द्यायच तर धडा क्र. ४ वर पहिल्यांदा ६ प्रश्न असतील. जर या प्रश्नांमधल २ पेक्षा जास्त उत्तर चुकली तर हा धडा परिक्षार्थीचा कच्चा आहे अस समजुन या धड्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. याचा अर्थ एखाद्या मुलानी कमीत कमी चुका करुन पेपर सोडवला असेल, तर त्याच्या साठी १५-२० प्रश्नांचीच परिक्षा असेल पण ज्या मुलानी अनेक चुका केल्यात, त्याच्या साठी ३०-३५ प्रश्नांची परिक्षा असेल.

याचा फ़ायदा असा होतो की विद्यार्थ्याला विषय नक्की समजला आहे की नाही हे सहज समजु शकत. मला वाटत की अशा प्रकारची परिक्षा असण जास्त गरजेच आहे.

आपण अशा परिक्षा व सध्याची परिक्षापद्दती यांची तुलना केल्यास

१. सध्याच्या परिक्षा : वर्षभर अभ्यास केल्यावर फ़क्त एका दिवसात त्या मुलाची संपूर्ण वर्षाची परिक्षा घेतली जाते. जर तो मुलगा परिक्षेच टेंशन घेत असेल, त्याला आधल्या रात्री झोप आलेली नसेल, काही आजारपण असेल अथवा टेंशन असेल तर त्याच्या त्या परिक्षेची पार वाट लागते.

ओनलाईन परिक्षा : या संगणकावर ओनलाईन असल्यामुळे वर्ष भरात केव्हाहि दिली तरी चालते व त्यामुळे विद्यार्थी जेव्हा परिक्षा देण्याच्या मानसिक अवस्थेत असतो तेव्हा तो या परिक्षा देऊ शकतो.

२. सध्याच्या परिक्षांचा सर्व साधारण पॅटर्न पाहु. १३० ते १४० मार्कांचा पेपर असतो. त्यात १०० मार्कांचा पेपर सोडवायचा असतो व ३३ % पासींग. याचा अर्थ आधीच मुलं ३०-४० मार्कांचा पोर्शन ओप्शनला टाकतात. याचा अर्थ जेव्हा एखाद्या मुलाला ३३% मार्क मिळावुन तो पास होतो, तेव्हा त्याला खर्‍या अर्थी ३३/१४० म्हणजेच २५% विषय समजलेला असतो. मी त्या मुलाला मिळणारे ग्रेस मार्क वा त्यानी कॉपी करुन मिळवलेल्या मार्कांचा विचार केलेला नाही. आता असा २५% विषय समजलेला विद्यार्थी पुढल्या वर्गात जातो. यातच आपल्या सध्याच्या परिक्षा पद्दतीत असलेली कमतरता दिसुन येते.

डायनॅमिकली बदलणार्‍या ऑनलान परिक्षांमधे पोर्शन ऑपशनला टाकायला चान्स नसतो. एखाद्या धड्यात विद्यार्थी कमजोर वाटला तर त्या धड्यावर जास्त प्रश्न विचारुन खरोखर विद्यार्थ्याला विषय समजला आहे का नाही याची चाचपणी केली जाते.

३. ओनलाईन पेपर हा एका लोकल भागासाठी तयार केलेला नसतो त्यामुळे कधी कधी त्यातली भाषा विद्यार्थ्यांना समजत नाही व त्यामुळे विषयाच ज्ञान असल तरी बरोबर उत्तर देता येत नाही.


निरंजन प्रधान

No comments:

Post a Comment